Tuesday, June 26, 2007

काल पाऊस कोसळत होता
मुसळधार असुनही कोरडाच होता,
ढग असुनही आभाळात भरपुर
चंद्र आज एकटाच होता।

सागराचे आणी माझे
कधीही सुर जुळत नाहीत,
कारण माझ्या मनातील वादळे
त्यालाही कधीही दिसत नाहीत.

जिवनाची लढाई आज
एकटाच असा मी करत आहे,
सखे तुझी साथ मिळाली तर
विजय माझा नक्की आहे.

सरतेशेवटी मरते ति काया
प्रेम काही मरते नसते,
शेवटी मरुन जगण्यासाठी
प्रत्येक मन व्याकुळ असते.

तुझा प्रत्येक अदांचा मी
मनात संग्रह करत गेलो,
त्याच भावनांचा संग्रहातुनच
मी माझा कवीता करत गेलो.

प्रत्येक माणुस येता जाता
मला विचारतो काय जिवन कसं चालले आहे?
कसं काय सांगु त्यांना
की मी माझ्या दारात मरण आहे।

--ओंकार तोरसकर


No comments:

Post a Comment