Thursday, May 31, 2007


काळ खूप पळतो....
पण आठवण तशीच राहते.....
म्रुगजळातील पाणी जसे
फ़क्त दिसायला वाहते.....

आठवनींना थांबवलं तरी...
त्या थांबत नाहीत....
वर्तमानाच्या भुतकाळाशी....
गप्पा लांबत नाहीत....

काही मानस कशी
पिंपळाच्या पानासारखी असतात
सुकून जाळी झाली तिरही
जीवनाच्या पानात जपावीशी वाटतात

एक चूक लपवताना
दुसरी चूक करावी लागते...
चुका करत करतच मग
अवघे आयुष्य जगावे लागते...

उष्ट्या बोरांचा अर्थ
लावावा तसा लागतो
खरा राम मात्र
उष्टी बोरं मागतो

क्लास सुटल्यावरं वाटलं
खूपसं शिकवायचं होतं
सगळ्यांच्या डोक्यावरून गेलं तरी
अजून बरचं गुंडाळायचं होतं!!!!!!!!!!!


No comments:

Post a Comment